Ladki Bahin Yojana e kyc error : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अनेक लाभार्थी महिलांची प्रक्रिया रखडली आहे.
ही प्रक्रिया शासनाने केवळ पात्र महिलांना वेगाने लाभ मिळावा यासाठी राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ मिळणार नाही.त्यानुसार ठीक ठिकाणी महिला आपली ई केवायसी पूर्ण करत आहेत. मात्र, अलीकडच्या काही दिवसांत अनेक महिलांना ई- केवायसी करताना तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती मिळत आहे.
ई-केवायसी म्हणजे काय?
या योजनेत नोंदणी केलेल्या प्रत्येक पात्र महिलेला आपली आधार कार्ड, मोबाईल क्रमांक व बँक खात्याची पडताळणी करून ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. शासनाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
ई-केवायसी (e kyc) प्रक्रियेचा उद्देश

ई-केवायसी म्हणजे “Electronic Know Your Customer” — लाभार्थ्यांची ओळख, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक यांची पडताळणी करण्याची डिजिटल प्रक्रिया. याचा उद्देश म्हणजे—
केवळ पात्र महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे.फसवणूक आणि बनावट नोंदणी टाळणे.राज्यभरातील नोंदणी प्रक्रियेला पारदर्शकता मिळवून देणे.
तांत्रिक अडचणींनी महिलांना दिला त्रास !
गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत महिलांना अधिकृत संकेतस्थळावर (https://ladkibahin.maharashtra.gov.in) ई-केवायसी करताना “Error” असा संदेश दिसत आहे. Ladki Bahin Yojana e kyc error:काही ठिकाणी मोबाईल क्रमांक स्वीकारले जात नाहीत, तर काहींच्या OTP पडताळणीचा टप्पा अयशस्वी ठरतो.
परिणामी, हजारो महिलांची प्रक्रिया अपूर्ण राहिली असून त्यांना लाभ मिळण्यात विलंब होत आहे.वेबसाइट आणि पोर्टल वारंवार बंद पडत आहेत (लॉगिननंतर “Technical Error” संदेश).काही जिल्ह्यांत इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी असल्याने प्रक्रिया संथ गतीमध्ये आहे.काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आधार क्रमांक न जोडल्याने पडताळणी अयशस्वी होत असल्याचे चित्र समोर आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत ६० लाखांहून अधिक महिला ई-केवायसीसाठी नोंदणीकृत आहेत. त्यापैकी अंदाजे १५-२०% प्रक्रियेत तांत्रिक कारणांनी विलंब झाला आहे.
सर्वाधिक तक्रारी खालील जिल्ह्यांतून नोंदल्या गेल्या आहेत —
●पुणे
●नागपूर
●जळगाव
●नाशिक
● छत्रपती संभाजीनगर
● धाराशिव
या सर्व प्रकारावरती महिला व बालविकास मंत्री श्रीमती अदिती तटकरे यांनी महिलांना येत असलेल्या अडचणीची ही समस्या लवकरच दूर होईल अशी माहिती आपल्या एक्स खात्यावरून दिली आहे.
अहिल्यानगर, धाराशिव, नाशिक, जळगाव, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतून महिलांनी सांगितले की —
> “अनेकदा प्रयत्न करूनही OTP येत नाही, काही वेळा वेबसाइटच बंद होते. संगणक केंद्रात गेले तरी सिस्टम लॅग होत आहे,”असे एका लाभार्थिनीने सांगितले.
> “तीन दिवसांपासून प्रयत्न करत आहे, पण वेबसाइट Error दाखवते. संगणक केंद्रात गेलं तरी प्रक्रिया पूर्ण होत नाही,”असे पुण्यातील एका लाभार्थिनीने सांगितले.
Maharashtra work hours extension: महाराष्ट्र सरकारच्या कामाचे तास वाढविण्याच्या निर्णयावरून वादंग
प्रशासनाची भूमिका
महसूल व महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की —
राज्यभरात सर्व्हरवरील तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्याचे काम सुरू असून, सर्व्हर क्षमतेत वाढ केली जात आहे.तसेच जिल्हा व तालुका स्तरावर सहाय्य केंद्रे (Help Desks) उघडण्यात आली आहेत, जिथे महिलांना प्रत्यक्ष मार्गदर्शन व ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत मिळेल. Ladki Bahin Yojana e kyc error:
राज्य सरकारने Ladki Bahin Yojana e kyc error या अडचणी दूर करण्यासाठी खालील तातडीचे उपाय सुरू केले आहेत:
•सर्व्हर क्षमतेत वाढ करण्याचे काम सुरू आहे.
•तांत्रिक तज्ञांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
•जिल्हा व तालुका स्तरावर सहायता केंद्रे स्थापन.
•२४ तास कार्यरत हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याची तयारी.
अपंग आणि दुर्गम भागातील महिलांसाठी मोबाइल सेवा युनिट सुरू करण्याचा विचार.
इ केवायसी करताना शासनाने दिलेल्या सूचना
*लाभार्थी महिलांनी जवळच्या महसूल कार्यालयात, ग्रामपंचायतीत किंवा संगणक सेवा केंद्रात (CSC) जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी.
*ई-केवायसी करताना आधार क्रमांक, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक एकमेकांशी जोडलेले (linked) असल्याची खात्री करावी.
*अधिकृत संकेतस्थळावर पुन्हा लॉगिन करून OTP पडताळणी करून पहावी.
*प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित तालुका कार्यालयाशी संपर्क साधावा.
त्रुटी लवकर दूर होणार
शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हर आणि प्रमाणीकरण यंत्रणेत सुधारणा केल्यानंतर पुढील काही दिवसांत Ladki Bahin Yojana e kyc error या त्रुटी दूर होतील.राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की, ई-केवायसी यशस्वी झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात आर्थिक सहाय्य जमा होईल.
must read : पासपोर्ट काढायचा आहे? चला, एजंटला ‘टाटा-बायबाय’ करूया! फक्त 21 दिवसांत तुमचा पासपोर्ट घरपोच!
योजनेच्या पात्रतेबाबत महत्त्वाचे बदल
आता लाभार्थी महिलांसोबत त्यांच्या पती किंवा वडिलांचीही ई-केवायसी आवश्यक करण्यात आली आहे, कारण कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असावा हा निकष लागू आहे.
काही ठिकाणी पती किंवा वडील हयात नसल्यास किंवा त्यांचा आधार क्रमांक उपलब्ध नसल्यास समस्या भेडसावत आहेत.
योजनेचा उद्देश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १,५०० रुपये आर्थिक मदत देण्यासाठी आहे.या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यभरातील लाखो महिलांनी नोंदणी केली असून, शासनाचा उद्देश महिलांना आर्थिक आणि सामाजिक बळकटी देण्याचा आहे.महसूल विभागाने सांगितले आहे की सर्व तांत्रिक त्रुट्या दूर करण्यासाठी येत्या आठवड्याभरात सर्व्हर अपग्रेड पूर्ण होईल. त्यानंतर अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियाही स्वयंचलितरीत्या पुन्हा सुरू केली जाईल.राज्य शासनाने महिलांना संदेश दिला आहे की कोणत्याही गैरसमजांना बळी न पडता संयम बाळगावा, कारण पात्र सर्व लाभार्थ्यांना अनुदान देण्याबाबत शासन कटिबद्ध आहे.










Leave a Reply